स्थानिकांना काम देण्याची सुरज ठाकरेची मागणी

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरज ठाकरे यांनी दिले निवेदन.
चंद्रपूर – कोरपणा तालुक्यातील नारंडा येथे मुरली सिमेंट नावाने पूर्वी सिमेंट उद्योग होता परंतु व्यवस्थापनाच्या गडबडीने हा सिमेंट उद्योग बंद पडला आता परत पुन्हा तो सिमेंट उद्योग सुरु होणार असल्या बाबतची चर्चा सर्वत्र होत आहे यामध्ये स्थानिकांनाच काम मिळावे याकरिता सुरेश ठाकरे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना आज दिनांक २२/०६/२० रोजी निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये सुरेश ठाकरे यांनी इतर सुरू असलेल्या सिमेंट उद्योगांचे उदाहरण देत असा आरोप केला आहे की राजुरा विधानसभा क्षेत्रातील माणिक गड अल्ट्राटेक अंबुजा यासारख्या मोठ्या सिमेंट उद्योगांनी या भागातील सामान्य जनतेचे व कामगारांचे शोषण केले आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करून हे सर्व सिमेंट उद्योग उभे करण्यात आले त्या शेतकऱ्यांच्या वारसांना या सर्व सिमेंट उद्योगांनी दाखवली असून या सर्व सिमेंट उद्योगांमध्ये कायमस्वरूपी कामावर सामावून घेतलेले नाही तथा या सिमेंट उद्योगांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये देखील पोहोचत असताना सी सी आर फंड च्या माध्यमातून कुठल्याही गावाचा विकासामध्ये हे सर्व सिमेंट उद्योग सहकार्य करीत नाहीत हा सर्व अनुभव लक्षात घेता नारायण येथे परत पुन्हा पूर्ववत सुरू होत असलेल्या सिमेंट उद्योगा मध्ये जर स्थानिक बेरोजगारांना काम मिळाले नाही तर हा उद्योग सुरू न होऊ देण्याचा धमकी वजा इशारा सुरज ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला आपल्या निवेदनातून दिला आहे
सुरज ठाकरे यांची आंदोलनाची भूतपूर्व पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांनी बरेच वर्षानंतर अशा पद्धतीचे आक्रमक रूप घेतल्याचे या निवेदनाच्या माध्यमातून दिसत आहे समोर प्रशासन त्यांच्या या निवेदनाला व धमकीला कशा पद्धतीने उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरज ठाकरे यांची आंदोलनाची भूतपूर्व पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांनी बरेच वर्षानंतर अशा पद्धतीचे आक्रमक रूप घेतल्याचे या निवेदनाच्या माध्यमातून दिसत आहे समोर प्रशासन त्यांच्या या निवेदनाला व धमकीला कशा पद्धतीने उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
