Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे सहजयोग्यांकडून वर्धा नदीवर जलपूजन 

वणी( 4 मे) :- वणी व वरोरा तालुक्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील पाटाळा पुलाखाली नदीत वणी येथील सहजयोग्यांच्या समूहिकतेने अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सामुहिक जल पूजन करून महाराष्ट्रासह भारतात पुरेसा जल वर्षाव निसर्ग देवतेकडून व्हावा यासाठी जिल्हा समन्वयक एकनाथ सारवे यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी प्रार्थना करण्यात आली.

      आपल्या जीवनात पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. माताजी निर्मला देवींनी सहजयोग्यांना स्वतःच्या स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग करायला सांगितला आहे. अक्षय तृतीया परमेश्वराकडे पाऊस मागण्याचा (अक्षय जलस्रोत) दिवस आहे.

पूर्ण भारत भर  अक्षय तृतीयेला समुद्रावर, नदीवर  समुद्र देवता/ जल देवतेचे पूजन करून भरपूर जलवर्षाव होऊन देश अन्न धान्यांनी समृद्ध करण्यासाठी वणी परिसरातील सर्व सहजयोग्यांना नदीवर जाऊन सगळीकडे संतुलित व चैतन्यमय पर्जन्यवृष्टी होवो व ही संपूर्ण भारत भूमी सुजलाम, सुफलाम होवो अशी प्रार्थना करून जल पूजन केले.

 

या प्रसंगी वणी विभाग समन्वयक रवी कुंटावार, योगेश इंगळे, सुधाकर सवाई, रामकृष्ण मेश्राम, संजय कुंटावार, मोहन हेपट, विकास मेश्राम व मोठ्या प्रमाणावर महिला मंडळ उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!