समतादूतांद्वारे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..
समतादूतांद्वारे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..
विदर्भ 24 न्यूज़ ब्रम्हपुरी:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या वतीने सुरु असलेल्या ‘समतादूत’ प्रकल्पाअंतर्गत २०१५ पासून वेगवेगळी कामे केली जात आहेत. थोर संत, थोर महापुरुष, भारतीय संविधान, जातीप्रथा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टीकोन ई. विषयांवर प्रबोधन याव्यतिरिक्त अनेक सर्वे, समाज कल्याण च्या योजना गावागावात पोचविण्याचे काम समता दूत करत असतात. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या जागतिक मंदित सुद्धा समता दूत जनजागृतीचे काम करत आहेत. सण २०२०, अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष, यानिमित्ताने महाराष्ट्र भर ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे वेगवेगळे वक्ते घेऊन समतादूत प्रबोधनकार्य करीत आहेत. याच धर्तीवर बार्टी चे महासंचालक आदरणीय कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालक आदरणीय प्रज्ञा वाघमारे, चंद्रपूर जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी आदरणीय मनीष गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी तालुक्यात समतादूत प्रिती मेश्राम आयोजित वक्ते म्हणून आदरणीय मोहन देवतळे, प्रदेशाध्यक्ष,अ.भा. मादगी समाज संघटना, म.रा. यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्या वर खूप छान प्रबोधन केले. “पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून येथील दिन दुबळ्या, कष्टकरी जनतेच्या तळहातावर उभी आहेे.”असा अन्नभाऊंचा महत्वाचा संदेश त्यांनी आपल्या प्रबोधनातून दिला. आणि बार्टी च्या स्तुत्य उपक्रमाबद्दल बार्टीप्रती आभार व्यक्त केले.

बातमी व लेख,जाहिरातिसाठी संपर्क साधा-9422645343




