साहित्यरत्न,लोकशाहीर आदरणिय अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब पुरस्कारासाठी शिफारस करावी..
साहित्यरत्न,लोकशाहीर आदरणिय अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब पुरस्कारासाठी शिफारस करावी..
-मा.उद्धवजी ठाकरे,मुख्यमंत्री यांचेकडे केली मागणी :- मा.मोहन देवतळे
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/गड़चीरोली:- साहित्यरत्न, लोकशाहीर आदरनिय अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता येत्या ०१ आँगस्ट २०२० रोजी होत आहे, मागास समाजातून पुढे आलेल्या आद. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, शोषित व उपेक्षित समाजाच्या व्यथा, वेदना, देैन्य यांच वास्तव आपल्या साहित्यकृतीतून अतिशय परीणामकारकरित्या मांडल्या, त्यांची “फकिरा” या कांदबरीमुळे अण्णाभाऊ नी साहित्यक्षेत्रात ठसा उमटवला, एवढचं नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रत्यक्षात सहभागी होऊन सामान्य माणसात जनजागृती करून हा लढा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. अशा विविध अंगी क्षेत्रातील त्यांची भरीव कामगिरी लक्षात घेता व मादगी, मांतग तसेच तत्सम समाज व बहुजन समाजाच्या मनातील त्यांच्या विषयीची आस्थेचा विचार करून त्यांच्या समाजकार्याचा गोैरव करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम बांधवाच्या वतीने अ.भा.मादगी समाज संघठनेचे प्रदेशाध्यक्ष मोहनभाऊ देवतळे,यांनी करीत आहे.
करीता त्यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यासाठी राज्यमंत्रीमंडळाने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे याबाबत शिफारस करण्यात यावी,आशी मागनी मा.उद्धवजी ठाकरे,मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.



