शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या
नितीन गोहणे यांची मागणी
विदर्भ24न्यूज (प्रतिनिधी )
मागील वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये रानडुकरांच्या उपद्रवा मुळे अनेक शेतकऱ्याचे हातात आलेले धान पीक नष्ट झाले होते, वनविभाग सावली ने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे पंचनामे केले होते. शासन स्तरावर शेतकरायचे पैसे मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाकडून एक वर्षाचा कालावधी लोटून जात असतांना सुद्धा शेतकऱ्याच्या बचत खात्यात रक्कम वडती करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी शाशणाच्या लाभापासून वंचित होता सदरची बाब सावली तालुका काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन गोहणे यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी याबाबतचे निवेदन माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार मंत्री बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन, तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा याच्या कळे निवेदनदारे लक्ष्यात आणून दिली
माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी त्वरीतमुख्य वन संरक्षक चंद्रपूर यांचेशी भ्रमनधनि वरून संपर्क साधला आणि मागील ऑक्टोबर 2019 मध्ये रानडुकरांच्या उपद्रवामुळे धानशेतीचे झालेले नुकशाणीचे पैसे त्वरीत शेतकऱ्याचे खात्यात जमा करणेबाबत निर्देश दिले
विशेष म्हणजे शासन स्तरावर पैसे मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वडती करण्यात आली नव्हती पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात आता लवकरच रक्कम वडती होत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये आनंदी वातावरण दिसून येत आहे



