ग्रामविकासात युवकांची भूमिका महत्त्वाची – रजनीताई घुगरे
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ( Best Practice) ग्रामविकासात युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना रजनीताई घुगरे (कवाडकर) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार आणि कार्याने युवकांनी प्रेरीत होऊन ग्रामविकासात भूमिका बजावावी असे आवाहन केले. ग्रामगीतेतील विविध ओव्यांचे संदर्भ देत ग्रामविकास ग्राम उन्नती हीच देशाच्या उन्नतीचा मूलमंत्र असून युवकांनी यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी हे ब्रीद पाळावे असेही त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे हे होते . विचारमंचावर प्रा .महानंदा भाकरे उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण बोरकर यांनी केले .संचालन आकाश चौधरी यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी मानले.



