विना गाज्यावाज्याने संप्पन झाला विवाह सोहळा
विना गाज्यावाज्याने संप्पन झाला विवाह सोहळा
कवठी प्रतिनिधी
संपूर्ण जगामध्ये कोरोना वायरसने थैमान घातले आहे. सगळी कडे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे लग्न सोहळ्याच्या उत्साहावर विरजण पडले आहे आणि म्हणून वाज्यागाज्या ला परवानगी नसल्यामुळे यातूनही एक उपाय म्हणून वाटा शोधत अनेकजन साधेपणाने विवाह करीत आहे. असाच एक विवाह सावली तालुक्यातील कवठी या गावामध्ये दि. 11जून ला आनंदरावजी पा. भोयर यांचे सुपुत्र वर चि. दुमाजी आणि मोरेश्वरजी पा. बट्टे यांची कन्या वधू जयश्री हिच्या सोबत मौजा कवठी येथे लावण्यात आले. विवाह सोहळा पार पडण्या अगोदर तोंडाला मास्क व सॅनिटायझर प्रत्येक व्यक्तीला लावायला दिले. सरकारी नियमानुसार सोशल डिस्टन्स पाडन्यात आले लग्न सोहळा पार पडताना सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. या विवाह सोहळ्याला तं.मु.स.अध्यक्ष राम म्हशाखेत्री उपस्थित होते. ना वरात ना, वाजा गाजा ना, फटाके ना, नाचना फक्त फुलांचे हार कपाळाला बारसिंग आणि तोंडाला मास्क अशा साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला.



