Vidarbh24News

Latest Online Breaking News

नवरगाव मध्ये जळाऊ लाकूड साठी भटकंती

*नवरगाव मध्ये जळाऊ लाकूड साठी भटकंती*

*फॉरेस्ट अधिकारी घेत आहेत पाहण्याची भूमिका*

*मयतीसाठी लोकांना आणावे लागतो सिंदेवाहीच्या टाल वरून जळाऊ लाकूळ*

सिंदेवाही तालुका प्रतिनिधी अमोल निनावे 9764271316:-सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला नवरगाव या ठिकाणी अनेक महिन्यापासून इथल्या लोकांना जळाऊ लाकूड मिळत नाही आहे. घरघुती जळाऊ लाकूड तर अनेक दिवसापासून मिळणा बंद झाले आहे मात्र ज्या घरी “मयत “होतो त्या घरच्या लोकांना सुद्धा अनेक दिवसापासून लाकूड मिळत नसल्यामुळे आता त्यांना डायरेक्ट सिंदेवाहीच्या वनविभागाच्या टाल वरून जळाऊ लाकूड आणून आपले अंत्यविधी पूर्ण करावे लागतो आहे. त्यामुळे सर्वसाधारण वेक्ती सिंदेवाहीला वेळेवर जाऊन लाकूड आणणार काय असे अनेक प्रश्न आता नवरगाव वाशीय जनते मध्ये निर्माण झालेले आहे. या अगोदर “सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या “वतीने वनविभाग कार्यालय वरती जळाऊ लाकूड सर्वाना उपलब्ध करून दयावे यासाठी मोरच्या काढल्यामुळे सर्व लोकांना जळाऊ लाकूड उपलब्ध करून दिले होते. मात्र आता सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आढळून येत आहे. येत्या आठ दिवसात जर जळाऊ लाकूड उपलब्ध झाले नाहीतर सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन तसेच “भव्य मोर्चा” करण्याचे ठरविले आहे. यात नवरगावचे बहुसंख्य लोकांनी सहभागी व्हावे अशी विनंती सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य श्री अमोल निनावे यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!