हत्तींनी धान पिकांत माजवला कहर

गडचिरोली:मुख्यालया पासून जवळच असलेल्या जेप्रा, राजगाटा माल , दिभणा या परिसरात दोन दिवसापासून रानटी हत्तीचा कळप आला असून,ह्या कळपाने धान शेतीत धुमाकूळ घालून परिसरातील अनेक हेक्टर धान पीक पायदळी तुडवून उध्वस्त केले आहे
यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून वनविभाग प्रत्येक्षात शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य नेताजी गावतूरे व गावातील शेतकऱ्यांची आहे. यावर वनविभाग काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.