*वृक्षारोपण करून शिव जयंती साजरी
*वृक्षारोपण करून शिव जयंती साजरी
*वरोरा:–उखर्डा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वृक्षरोपण करून साजरी करण्यात आली , सर्व शासकीय नियमांचे पालन करून ही जयंती साजरी करण्यात आली*. *छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले*
*हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती….*
*आणी आजचा १६ वर्षाचा युवा काय करतोय ? सर्वच म्हणता येणार नाही , पण काही युवक हे तरुणाईत पाऊल टाकताना रस्ता चुकत आहेत . वयात आलेल्या आजच्या पिढीला शिवचरित्र समजावून सांगणे काळाची गरज आहे . आणी जर त्यांना खरे शिव चरित्र समजलेच ” तर मघ बघाच हा देश , ही पिढी कुठल्या कुठे असेल ती…* *असे मार्गदर्शन उपसरपंच प्रमोद फरकाडे यांनी उपस्थित युवकांना केलें*
*दिवसाण दिवस झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे प्राणवायू चे प्रमाण दिवसागणिक कमी होत आहे वृक्षारोपण करून वृक्ष सवर्धन करणे हि काळाची गरज आहे. हिच गरज ओडखून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. गावात वृक्षारोपण केल्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्तावरील सोंदर्यात भर पडनार आहे या मुळे नक्कीच गावाची शोभा वाढणार आहे . न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था चे सदस्य प्रत्येक वाढदिवस निमित्त काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत असतात यावेळी प्रमोद फरकाडे (उपसरपंच)अभिजित कुडे(रोहित दादा पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष) विलास कुडे (माजी उपसरपंच) शुभम हिवरकर , राहुल डोमकावडे , दीपक कुडे योगेश पुसदेकर , वैभव पुसदेकर, प्रफुल डोमकावडे ,विनोद कोठारे, रंजीत कुडे ,विजय कुडे ,तेजस ऊरकुडे,तुषार उरकुडे , , रोहित उरकुडे , उपस्थित होते ,या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था चे सदस्य नी घेतली*



