हाथरस प्रकरणातील आरोपीना फाशी द्या-वंचित बहुजन आघाडीची मागणी
हाथरस प्रकरणातील आरोपीना फाशी द्या
*वंचित बहुजन आघाडीची मागणी
उत्तर प्रदेशातील गाव भूलगडी जि. हाथरस येथील विद्यार्थिनी मनीषा वाल्मिकी हिचेवर नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापली व खून केला. परंतु उत्तर प्रदेश सरकार सदर प्रकरण दाबण्याच्या तयारीत असून गुन्हेगाराना पाठीशी घालत आहे. याचा तीव्र निषेध करून आरोपींना फाशी देण्यात यावी. उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करून राष्ट्र पती शासन लागू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी सावली च्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
लोकशाही प्रधान देशात दलितांवर होणारे अत्याचार दिवसागणिक वाढत आहेत. यावर ठोस निर्णय घेण्यात यावा व जलद गती न्यायालयात सदर खटला चालवून आरोपींना फाशी ची शिक्षा ठोठावन्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नगारे सर, कांतिलाल बोरकर, विलास माहोरकर, वसंत बोरकर, रोशन बोरकर, मदन मेश्राम, संजय घड्से आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



