भूमिपुत्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजूर इजारा द्वारा आयोजित अखिल भारतीय निबंध स्पर्धा

– युगात्म शरद जोशी व स्व. प्रमोद मारोती बलकी यांच्या स्मृति प्रित्यर्थ
.
वणी – सध्या महाराष्ट्रात आणि देशामधील परिस्थितीचा आपण सामना करत आहात, गेले कित्येक महिने आपण सर्व संकटांचा धैर्याने मुकाबला केला आहे, दरम्यान देश अनलॉक झाला म्हणुन आपण बिनधास्त बाहेर पडलो ,खरच आपलं हे वागणं योग्य आहे का?नेमका हाच विषय घेऊन युगात्मा शरद जोशी व स्वर्गिय प्रमोद मारोती बलकी यांच्या स्म्रृती प्रित्यर्थ भुमिपुत्र बहुउद्देशिय सामाजिक संस्था राजुर ईजारा व्दारे अखिल भारतीय निबंध स्पर्घा घेण्यात आली होती .
“मुक्त व्हा..लिहते व्हा..” लॉकडाऊन नंतरचे मानवी जीवन या विषयाला अनुसरुनच हि स्पर्धा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली होती.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धे मध्ये अपेक्षे पेक्षा जास्त लोक सहभागी झाले जवळपास 40 निबंधांची नोंद करण्यात आली होती ,एवढच नसुन सगळे निबंध अप्रतिम व कौतुक कराव तेवढ कमी अशा शब्दात निबंधांची नोंद झाली ,
त्यापैकी मा.अविनाश राजगुरे (सर्वोकृष्ट )डॉ. स्मिता माळवादे (प्रथम क्रमांक) स्नेहल शाह (व्दितीय क्रमांक ) मेघा पाटील (तृतीय क्रमांक) यांची निवड करण्यात आली आणि उत्तेजणार्क म्हणुन कु.-श्रध्दा महाडीक, श्रीपाद राउतवाड , पोपट निकम, पल्लवी उधोजी , सिध्दार्थ खेडे यांची निवड करण्यात आली, या स्पर्धेसाठी मार्गदर्शक पाहुने म्हणुन मा.गंगाधर मुटे (अ.भा. चळवळीचे प्रणेते) मा. सतीश बोळुरकर (अड मुबंई हायकोर्ट) परिक्षक म्हणुन मा.प्रशांत बलकी हे होते
आणि या स्पर्धेच्या कार्यासाठी कार्यरत असणारे भुमिपुत्र बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच माझे हक्काचे माणंस नेहमी सोबत असणारे वासुदेव वानखेडे, महादेव तेडेवार, रामकृष्ण सिडाम,वामण बलकी पोलीस पाटील नागाळा,मारेती बलकी, प्रकाश बलकी, प्रशांत बलकी,या सगळ्यांनीच भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल भुमिपुत्र बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व आदर्श कवयित्री रत्न गौरव पुरस्कार प्राप्त (महा. शासन २०१८) कु.लक्ष्मी प्रमोद बलकी यांनी सर्वांचे आभार मानुन सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या