*मुस्लिम समाजासाठी आरक्षण घोषित करा* *पोंभूर्णा मुस्लिम समाजाची मागणी* आघाडी सरकार सत्तेत असतांनी सन 2014
*मुस्लिम समाजासाठी आरक्षण घोषित करा*
*पोंभूर्णा मुस्लिम समाजाची मागणी*
आघाडी सरकार सत्तेत असतांनी सन 2014 साली मुस्लिम आरक्षण घोषित केले होते.
ही बाब मंबई उच्च न्यायालयाने सुध्दा मान्य केली होती.
त्यानंतर धार्मिकतेच्या आधाराचा ठपका ठेवत मुस्लिम आरक्षण रद्द करण्यात आले.
विविध आयोगाचे अहवाल सरकारकडे आहे.अनेक आयोगांनी मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे नमूद केले आहे.
मुस्लिम आरक्षण समिती सन 2015 पासून समाजासाठी झटत असून ,विविध आंदोलन सुध्दा केले आहे.
सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
पावसाळी अधिवेशनात डाॅ.महेमुद्दर रहेमान अभ्यास गटांनी दिलेल्या शिफारशीनुसार विधेयक पारित करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा.
*अशा मागणीचे निवेदन तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना पाठविले*
यावेळी श्री अतिक कुरेशी,आवेज शफीक कुरेशी,अनावज इसरार कुरेशी, शारुख पठाण,शफीक मुश्ताक कुरेशी, तौसिफ कुरेशी उपस्थित होते.



