पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ द्या.
चोखाजी भांडेकर सभापती सेवा सहकारी संस्था येवली यांची मागणी.
विदर्भ 24न्युज
जिल्हा प्रतिनिधी/ येवली: गडचिरोली तालुक्यातील १२किमी.अंतरावर असलेल्या येवली परिसरातील वैनगंगानदी,पोटनदया,नाले,सराडालगत असलेल्या शेत पुराच्या पाण्यात ८०% धाणारी शेती पाण्याखाली बुडाल्याने हजारो हेक्टर वर शेतकऱ्यांचे धान,कापुस,तुर,तिळ, सोयाबिन,पोपटी,पिकांचे फार मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे.गोसेखुर्द धरणाचे विसर्गाचे पाणी वैनगंगेच्या पात्रा तर सोडल्याने चिचडोह धरणामुळे येवली परिसरातील शिवणी,डोंगरगाव,गोविंदपूर,मारकबोडि, कृपाळा,हिरापुर,गुरवळा,दर्शनी,वाकडी, मूरखडा,मुळझा,इत्यादी गावे प्रभावी नुसकान झाल्याने ८०% शेतकर्यांचे फार मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे.तरी शासनाने तात्काळ मदत करावी ही मागणी चोखाजी भांडेकर सभापती सेवा सहकारी संस्था येवली यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारेकेली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343



