नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्राने सापाला दिले जीवनदान
नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्राने सापाला दिले जीवनदान
कवठी प्रतिनिधी
सावली तालुक्यालगतच असलेल्या कवठी गावामधील घटना. पावसापासून आपली बैलजोडी आणि शेतीचे अवजारे सुरक्षित रहावे याकरिता विकास भोयर यांनी शेतामध्ये झोपडी बनवली आहे. आणि नेहमीप्रमाणे आज पण विकास भोयर शेतीची कामे आटपून अवजारे ठेवन्याकरिता गेले असता, त्यांना अचानक झोपडी मध्ये साप दिसला. आणि त्यांनी लगेच सावली येथील सर्पमित्र राहुल लोनबले, रवी वाढई यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केले. आणि लगेच त्यानंतर सर्पमित्रानी घटनास्थळी जाऊन त्या सापाला पकडून सावली लगत असलेल्या जंगलात सोडन्यात आले. अशाप्रकारे नागपंचमीच्या दिवशी सापाला मिळाले जीवनदान.साप हा निसर्गातील अति महत्वाचे प्राणी असून अन्नसाखळी मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि एकूण धान्याच्या 25-30%नासाडी करणाऱ्या उंदीर व घुशींचा कर्दनकाळ आहे आणि म्हणून साप हा शेतकऱ्यांचाच नाही तर तो सर्व मनुष्य जातीचा मित्र आहे आणि त्यामुळे सापाला मारू नये. असे देखील सर्पमित्रानी सांगितले



