Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोवीडसाठी अल्प कालावधीसाठी परिचारिका नेमणे हा शासनाचा कोतेपणाःसमविचारी मंच

कोवीडसाठी अल्प कालावधीसाठी परिचारिका नेमणे हा शासनाचा कोतेपणाःसमविचारी मंच

गोंडपीपरी(प्रतिनिधी) नितीन रामटेके

संपूर्ण राज्यात करोनाने हाहाकार माजवलेला आहे.या स्थितीत आरोग्य कर्मचारी कमी पडत आहे.त्यातीलच परिचारीका हा महत्त्वाचा घटक आहे.मुळात सर्व शासकीय रुग्णालयात परिचारीका संख्येने कमी आहेत.
यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचने सतत मागणी केली पण शासनाने लक्ष दिले नाही.विभागीय आरोग्य संचालकांना, सबंधित मंत्री यांनाही कळवले.जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला कोरोना संकटात परिचारिकांची आठवण झाली.
नवीन निर्णयानुसार तीन महिने कालावधीसाठी परिचारिका नेमणूक करण्याचा मनोदय शासनाने व्यक्त केला आहे.याबाबत राज्यातील अनेक परिचारीका अधिसेवीकांनी समविचारी मंचच्या प्रमुखांशी संपर्क साधला.
यावेळी मृत्यूच्या छायेत वावरायला घेणाऱ्या परिचारिकांना केवळ तीन महिने नेमणूक म्हणजे अन्याय आहे.गरज सरो वैद्य मरो हा शासनाचा डाव कोणत्याही स्थितीत चालणार नाही.अशी भुमिका घेऊन तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे.
परिचारीका नेमायच्याच असतील तर सरळ थेट सेवा भरती म्हणून घ्या अल्पकालीन नेमून त्यांच्या जीवाशी खेळू नका.असे समविचारी संघटनेचे जिल्हा प्रमुख संदीप वासाडे ,समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये,महासचिव श्रीनिवास दळवी,प्रदेशाध्यक्ष बापू कुलकर्णी,युवा प्रमुख निलेश आखाडे,परिचारीका राज्य संघटक सौ.प्रियाजी हल्याळकर यांनी म्हटले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!