वणीतील जनता कर्फ्यू रद्द

* *वणीतील जनता कर्फ्यू रद्द*
शनिवारी दिनांक 27 ला काही वणीतिल सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता.हे वणीतिल जनतेला धक्कादायकच बाब होती.अद्याप लॉकडावून संपले नसताना सुद्धा कर्फ्यू लागू करने हे तर लोकांना न समजल्यासारखेच झाले होते.तरीही लोकांना आता कर्फ्यू ची गरज आहे की नाही ह्याचे सुद्धा भाण नेत्यांना कढले नाही.कर्फ़्यू बाबत चर्चा पूर्ण वणी भर पसरली.लगेच रविवारी ह्या प्रकरणात खा. सुरेशजी धानोरकरानी उड़ी घेतली .संध्याकाडी एसडीओ यांच्या उपस्थितीत काही नेत्यांनी तसेच प्रशासकीय अधिकार्याची बैठक घेतली.बैठकीनंतर खा. धनोरकरानी या कर्फ्यूत प्रशासनाचा काहीही सहभाग नाही.असे सांगत हे कर्फ्यू बंधनकारक नाही असे जाहिर केले.त्यानंतरही सोमवारी कर्फ्यूला 80 टक्के प्रतिसाद असला तरीही जनता करफ्यूला का स्थगिति देण्यात आली ? हे प्रश्नार्थक चिन्ह निमार्ण झाले आहे .तसेच लोकही आश्चर्य चकित झाले आहे . आता लोकाचा मनात असे वाटू लागले की , नेमके वणीत भाजी कोणाची शिजत आहे ? ह्याचा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.आणि नेमके क़ाय चालले वणीत? …..