राज्य सरकारची मोठी घोषणा; पत्रकार वारीशेंच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर*
*राज्य सरकारची मोठी घोषणा; पत्रकार वारीशेंच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर*
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. आता वारीशे यांच्या कुटुंबाला सरकारने आज मदतीची घोषणा केली आहे.
या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा पोलीस कोठडीत आहे. वारीशे कुटुंबाला मदत करण्याच्या मागणीने जोर धरला असून अखेर आज या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने वारीशे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख, अशी एकूण 25 लाखाची मदत जाहीर केली आहे. तर शिक्षण घेत असलेल्या वारीशे यांचा मुलगा यश यालाही कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.



