वय 35 च्या पुढे गेले……. तरी होईना लगीन… !

•मुली उच्चशिक्षित, मुले अल्पशिक्षित असल्याने समस्या
•वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता मुख्य कारण
वणी (10.मे ):- साधारणपणे मुलीचे वय 18 तसेच मुलाचे वय 21 पूर्ण झाले की, विवाहबंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, सध्याच्या काळात आत्मनिर्भर होऊन करिअरच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लग्नाविषयी वयाचा नियम बदलला आहे. लग्नाअगोदर करिअर करावे, अशी प्रत्येक मुलाची तसेच मुलीची इच्छा असते. त्यामुळे मुले 30 वर्षे वय होईपर्यंत लग्न करत नाहीत,
तर मुली 25 वर्षे वय होईपर्यंत लग्न करीत नाहीत. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे, हा हेतू ठेवून मुली शिक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात जागरूक होत आहेत. मुली उच्चशिक्षित होत आहेत, मुलांपेक्षा मुली जास्त शिक्षण घेत आहेत. परिणामी, शिक्षणाच्या दृष्टीने मुले मुलींपेक्षा मागे पडत आहेत. त्यामुळे योग्य वर न मिळाल्याने मुलींची लग्ने रखडत आहेत,तर शिक्षण कधी कमी पडत आहे
बऱ्याच गावात मुलांचे वय 35 च्या पुढे गेले आहे, तरी लग्न त जमत नाही, असे दिसत आहे. दोन ते ली पाच वर्षे लग्नासाठी वधू शोधूनही ि क्षा लग्न होत नसल्याने तरुण नैराश्यांचे त. गुलाम होत चालले आहेत. बदलती में ले जीवनशैली, मुलींच्या वराकडूनअसलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने तरुणांचे लग्न होत नसल्याचे चित्र इत दिसत आहे.
कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने बरेच तरुण सध्या वडिलोपार्जित
“शेतीतून उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु. केवळ शेतीच्या भरवशावर लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. नोकरी, शेती, शहरात घर अशी मुलींची अपेक्षा असते. त्यामुळे अपेक्षा पूर्ण होत नसल्याने मुलींची लग्ने रखडत आहेत. तर करू न शकल्याने मुलांची लग्न होत नाहीत. वाढती बेरोजगारी, लहान वयापासून व्यसनाधिन होणारे तरुण, शिक्षणाचा अभाव, गुन्हेगारी क्षेत्रांशी संबंध यामुळे तरुणांचे लग्न होण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मुली शिकून मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना मिळतेजुळते वर मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत.”