इंधन दरवाढीचा फटका; शेतकरी हैराण…….

•शेतमाल बाजारपेठेत आणनेही महागले .
वणी (8 मे):- पेट्रोल, डिझेलच्या दराबरोबर महागाई वाढली आहे. खासगी वाहतूकदारांनीही प्रवास दर वाढविले आहेत. भाजीपाला व रब्बी हंगामातील पिके निघत असून शेतकरी गावातून शहरातकडे भाजीपाला व अन्य पिके, साहित्य विक्रीसाठी आणत आहे. मात्र दरवाढीचा फटका त्यांना बसत आहे.
त्यामुळे पिके बाजारात विक्रीसाठी आणणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची स्थिती आहे. तरीही अडचण सहन करीत शेतकरी बाजारपेठेत माल आणत आहेत. शेतकरी पूर्वी बैलगाडीद्वारे शेतपीक विक्रीसाठी बाजारपेठेत आणत. त्यावेळी प्रवासासाठी साधने नव्हती. आता मात्र, बैलगाडीद्वारे पीक विक्रीसाठी आणणे परवडणारे याद्वारे फारच थोडा माल आणता येतो. त्यातच बैलगाडी, मजुरांचा खासगी खर्च परवडतच नाही. विशेष पर्यायच नाही.
शेतातून घरी आणि घरून बाजारपेठेत पीक विक्रीसाठी आणण्यासाठी त्रासदायक आहे. त्यातच भरणी, उतरणी आणि वाहन खर्च परवडणारा नाही. विशेष म्हणजे बाजारात शेतपीक आणल्यानंतर भाव योग्य मिळेल, अशी शाश्वती नाही. त्यामुळे काही जण गावातच मिळेल त्या भावात पिकासह भाजीपाल्याची विक्री करीत आहेत.
म्हणजे, लहान शेतकऱ्यांकडे बैलगाडी नाही. अशावेळी त्यांना वाहन केल्याशिवाय कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करीत शेतकरी शेती व्यवसाय करीत आहेत. मात्र, इंधन दरवाढीमुळे मालवाहतूकही महागल्याने फटका त्यांनाही बसत आहे. बी-बियाणे, खते, औषधे फवारणीचा खर्च अतिरिक्त वाढत आहे. त्या तुलनेत हातात मात्र फारसे काही पडत नाही. सध्या वाढत्या उष्णतेमुळे मजूरही मिळणे कठीण झाले आहे. त्यातच बाजारपेठेत पिकासह पेट्रोल, नाही. डिझेलचे भाव वाढल्याचे कारण सांगत खासगी वाहन केल्या शिवाय पर्यायच नाही…..
वाहतुकीवर होतो बहुतांश खर्च…
गेल्या सहा महिन्यांपासून इंधनाचे दर वाढले आहेत. परिणामी मालवाहतुकीचे दरही दुप्पट झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळूनही बहुतांश खर्च वाहतुकीत जात आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. – विठ्ठल शंकावार…. (कायर)