महाराष्ट्र मिटाओ, विदर्भ मिलाओ” शहरात अनोखे आंदोलन ……
•विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे काळा दिवस म्हणुन पाळण्यात आला…
वणी (1 मे) :- वणी विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुक्याच्या वतीने 1 मे हा काळा दिवस / विदर्भाचा विश्वासघात दिवस म्हणून पाळण्यात आला व “महाराष्ट्र मिटाओ, विदर्भ मिलाओ” आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासन लिहले आहे तेथे-तेथे महाराष्ट्र पुसून विदर्भ शासन करण्याचे आंदोलन करण्यात आले.

त्याचाच एक भाग म्हणून वणी येथे सुद्धा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात शहरातील विदर्भवादी बापूजी अणे चौकातून करण्यात आली. त्यांनतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून वनविभाग कार्यालय वणी येथे महाराष्ट्र शासन हे मिटवून त्या ठिकाणी विदर्भ शासन चे स्टिकर लावण्यात आले.

यावेळी विदर्भावाद्यानी डोक्याला, हात, पायाला त बांधून आजचा दिनाचा जाहीर निषेध केला .यावेळी या आंदोलनात प्रा.पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,राहुल खारकर,राजू पिंपळकर, अमित उपाध्ये,बाळासाहेब राजूरकर,विजयाताई आगबत्तलवार,देवराव धांडे,संजय चिंचोळकर,दशरथ पाटील,होमदेव कन्नके,अनिल गोवारदिपे, सुषमा पाटील,दिनेश रायपूरे, नीलिमा काळे,कलावती क्षीरसागर,पुंडलिक पथाडे, श्रीवल्लभ सरमोकदम यासह विदर्भवादी उपस्थित होते.





