चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर परिसरातील वैनगंगा नदी काठावर असलेली हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली* *लवकरात लवकर नुसकान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाची इशारा
चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर परिसरातील वैनगंगा नदी काठावर असलेली हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, लवकरात लवकर नुसकान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चामोर्शी: मागील तीन दिवसांपासून वैनगंगा नदीला महापूर आलेले असल्यामुळे नदी काठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून पुराचे पाणी भरून वाहत असल्याने शेतात उभे आलेले पीक भात ,कापूस, सोयाबीन, मिरची अश्या अनेक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुष्कान झाले आहे असे असताना पाण्याचा प्रवाह अधिक प्रमाणात वाहत आहे जर पुन्हा एक दोन दिवस असेच पूर राहिले तर शेतकऱ्यांच्या पिकांची किती नुकसान होईल याची कल्पना करून चामोर्शी तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहे , पूरग्रस्त शेतकर्यांना शेतात पंचनामे करून लवकरात लवकर नुष्कान भरपाई देण्यात यावी अशी मागणी चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे नुष्कान भरपाई येत्या एक ते दोन महिन्यात न मिळाल्यास तीव्र आंदोनलन करण्यात येईल , असे शेतकऱ्यांची म्हणणे आहे मोहन पिंपलशेंडे , दमयंती थेरे ,प्रकाश गौरकर, अभिप्राय पावडे, वासुदेव दिवसे ,महादेव पिंपलशेंडे, नरेंद्र धानोरकर , देवाजी भोयर ,कैलास कनाके , ईश्वर पावडे ,मोरेश्वर लिंगे ,दिलीप घोगरे, यशवंतराव देवतळे ,सुधाकर सरपे, आत्माराम घोगरे ,राकेश देवतळे, शालीकराव गेडाम असे गावागावातून आष्टी, अंनखोडा,उमरी,काढोली, रामपूर,जैरामपूर,बामणी,मुधोली गणपूर असे शेकडो गावातील शेकर्यांकडून होत आहे।



